- Table View
- List View
Itihas va Nagrikshstra class 6 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये अकरा व नागरिकशास्त्रामध्ये पाच प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'प्राचीन भारताचा इतिहास' दिलेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरा यांची सर्वांगीण माहिती मिळावी तसेच याद्वारे त्यांची सामाजिक एकात्मतेसंबंधीची जाणीव वाढीस लागावी हा उद्देश आहे. नागरिकशास्त्राच्या भागात 'स्थानिक शासन संस्था' याविषयी माहिती घेत असताना विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेचा सहभाग, महिलांच्या सहभागाचा आणि त्यांच्या सहभागातून झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्या देशातील कारभार संविधान, कायदे व नियमांनुसार चालतो हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले आहे.
Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.
Sarmisal - Novel: सरमिसळ - कादंबरी
by Shri. D.M. Mirasdarद.मा. मिरासदार लिखित सरमिसळ हे विनोदी कथासंग्रह असून यामध्ये लेखकांनी आपला वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव यामध्ये सांगितला आहे.
Shivchatrapati Parisar Abhyas Bhag 2 class 4 - Maharashtra Board: शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneशिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्रोत मानली जाते. पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तिदायी घटना दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून आणि व्यक्तिगत पातळीवर आलेल्या तक्रारींची व सूचनांची समितीने योग्य पद्धतीने छाननी करून प्रस्तुत पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे. तसेच आवश्यक तेथे काही अनुरूप अशा दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्रातील काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करण्यात आले आहे.
Ganit class 4 - Maharashtra Board: गणित इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये निसर्गत: असलेली चित्रांची आवड आणि स्वत: काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन हे पुस्तक चित्ररूप आणि कृतिप्रधान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रे शक्यतो बोलकी आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतील अशी आहेत. गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हावे, म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) स्वाध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायांमधील प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कंटाळवाणे होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पाठाच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती संवादरूपात पाठ्यपुस्तकात दिली आहे.
Marathi Balbharati class 4 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी बालभारती इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. इयत्ता चौथीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचनासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.
Marathi Balbharti class 2 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी बालभारती इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पुस्तकातील चित्रे पाहा. चित्रामधील वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी आणि माणस यांच्याशी बाला. चित्रातील गोष्टी समजावून घ्या आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना सागा. सगळ्यांनी मिळून गाणी म्हणा. पाठ वाचा. वाचता-वाचता समजून घ्या, पाठाखाली वगवगळ्या कृता दिल्या आहत. त्या गमतीदार आहेत. पाठ वाचला, की पाठाखालील कृतींची उत्तरे मिळतील आणि पाठहा अधिक चागल्याप्रकारे समजेल. त्यामधून वाचन-लेखन शिकताना खूप मजा यईल.
Ganit class 3 - Maharashtra Board: गणित इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हाव म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) 'स्वाध्याय' आणि 'संवादांचा' समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायामधील प्रश्न विद्याथ्यानो स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कटाळवाण होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.
Samanya Vigyan class 6 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सोळा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सामान्य विज्ञान विषयाच्या अपेक्षित क्षमता नमूद केल्या आहेत. या क्षमतांच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील आशयाची नावीन्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करणे, कृतींच्या आधारे माहिती मिळविणे, माहितीचे संकलन करणे व त्यानुसार वर्गीकरण, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे इत्यादींवर आधारित कृती, उपक्रम व आशयासाठी पुस्तकात विविध शीर्षकांचा वापर केला आहे. पुस्तकात दिलेली पूरक माहिती विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करू शकेल.
Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.
Khelu Karu Shiku class 2 - Maharashtra Board: खेळू करू शिकू दुसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti Va Abhyas Sanshodhan Mandal Puneखेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या पुस्तकामध्ये भरपूर चित्रे आहेत. ति पाहून कोणते खेळ कसे खेळावे हे कळण्यास मदत होईल. विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, साधी राखी, कागदाचे भिरभिरे, वाळलेल्या पानाफुलांपासून सौंदर्याकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे दाखवले आहे.
Khelu Karu Shiku class 3 - Maharashtra Board: खेळू करू शिकू इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti V Abhyas Sanshodhan Mandal Puneखेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, फुलपाखरू, बचतपेटी, नारळाच्या करवंटीपासून कलाकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी, रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे सारे या पुस्तकात दाखवले आहे.
Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. N. C. Dixitविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
Samanata
by Shri. Dinkar Sakrikarप्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.
The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी
by Leo Tolstoyलिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.
Yayati - Novel: ययाति - कादंबरी
by V. S. Khandekarएका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) MAR 210 S.Y.B.A. Y.C.M.O.U
by Rajan Gavas Dr Mangala Warkhede Dr Dilip DhondageMAR 210 Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Satyache Prayog Athava Atmakatha - Novel: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - कादंबरी
by Mohandas K. Gandhiमहात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादाची ही तिसरी आवृत्ती नवजीवन ट्रस्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांतून नवजीवन ट्रस्टने वाचकांना उपलब्ध करून दिलाच आहे. आज तो मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. श्री. आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपला मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्याची आम्हाला परवानगी दिली, याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ग्रंथाचे शेवटी छोटीशी विषयसूची जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाचकवर्गाची चांगली सोय होईल, अशी आशा आहे. महाराष्ट्रीय वाचकवर्ग पूर्वीप्रमाणे या आवृत्तीचाही यथायोग्य परामर्श घेईल, असा भरवसा वाटतो. ही चौथी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना आम्हास आनंद वाटतो. गांधीशताब्दी निमित्त मराठी जनता ह्या ग्रंथाचे प्रकर्षाने स्वागत करील, अशी आम्हास आशा आहे. ह्यातील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नियमावलीस धरून आहे.
Arthat
by Achyut Godboleअर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय चूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. खकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक घांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी कलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा हे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून कते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील मवंतांनी रवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत न् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच.
Samagra Ekankika FYBA - SPPU
by Premanand Gajviया एकांकिकांविषयी कोणतेही भाष्य करणं उचित ठरणार नाही. हा कलावंतांचा, रसिकांचा अधिकार. तरीही एक सांगितलं पाहिजे. "घोटभर पाणी' ही एकच एकांकिका प्रेमानंद गज्वीनी लिहिली असती नि नंतर काहीच लिहिलं नसतं तरी गज्वीचं नाव मराठी नाटयवाङ्मयाच्या इतिहासात सन्मानानं घेतलं गेलं असतं." असं म्हटलं गेलंय. अशा या एकांकिकेचे एकूण ३००० प्रयोग झाले असून ४५७ पारितोषिकं तिला प्राप्त झाले आहेत. या एकांकिकेचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषात अनुवाद झालेला आहे. आता पर्यंत लिहिलेल्या सोळा एकांकिका या पुस्तकात समग्र स्वरुपात प्रकाशित होत आहेत.
Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी
by Ranjit Desaiरणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.
Dhind FYBA - SPPU
by Shankar Patil“म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.” राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, “हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.” रामभाऊ हसून म्हणाले – “गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!” “अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.” “उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?” “अहो, काय चढलीया काय मला?” “अजून चढली न्हाई म्हणतोस?” “अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!” एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, “शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?” “शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?” “दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?” “माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?” “मग खाली जागा नव्हती काय?” “ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!” राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी
by Ratnakar Matkariमरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.