- Table View
- List View
Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetमराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.
Itihas Digest class 11 - Maharashtra Board Guide: इतिहास डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetइतिहास इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला पाठाचा सारांश देण्यात आला आहे. त्यावरून त्त्या प्रकरणात समाविष्ट असलेला पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत. या मार्गदर्शकात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. तसेच या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका व अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.
Mahatma Gandhiche Vichar - Novel: महात्मा गांधीचे विचार - कादंबरी
by R. K. Prabhu U. R. Raoश्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.
Ganit class 5 - Maharashtra Board: गणित इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दोन विभागामध्ये सोळा प्रकरण व त्याचे उदाहरणसंग्रह दिलेले आहेत. या पाठपुस्तकात काही पाठांच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती पाठ्यपुस्तकात संवादरूपात दिली आहे. ज्यांचा वापर विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासात वारंवार करावा लागतो, असे गुणधर्म व नियम चौकटींत दिले आहेत. तसेच, विचार करा, गणिती कोडी, शोधा म्हणजे सापडेल, खेळ यांचा वापर करून गणित विषय मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्राच्या सर्व भागांतील निवडक शिक्षक, तसेच काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करून घेण्यात आले आहे.
Ganit class 6 - Maharashtra Board: गणित इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, स्वयंअध्ययन प्रक्रियेवर भर दिला जावा, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात भूमिती, संख्याज्ञान, संख्याप्रणाली, अपूर्णांक, बीजगणित, व्यावहारिक गणित, माहितीचे व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक पाठ्यघटकाच्या शेवटी सरावासाठी सरावसंच दिले आहेत. या सरावसंचातील उदाहरणांची उत्तरे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. तसेच अध्ययन-अध्यापन प्रभावी होण्यास उपयोगी पडतील असे ‘आय.सी.टी. टूल्स' यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे.
Rajyashastra class 12 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneराज्यशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इ.स.१९९१ पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे. त्यात जगातील १९९१ पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्यांचा परिचय करून देण्यात आला आहे. पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत.
Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.
Itihas class 12 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात आपणास युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांचा ओझरता इतिहास ज्ञात करून देण्यात आला आहे. युरोपातील प्रबोधन, वसाहतवाद, वसाहतवादाविरुद्ध भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात उभारला गेलेला लढा, निर्वसाहतीकरणाची चळवळ, शीतयुद्ध आणि बदलता भारत यांचा अंतर्भाव या पाठ्यपुस्तकात केला आहे.
Shetkaryancha Asud - Novel: शेतकऱ्यांचा आसूड - कादंबरी
by Mahatma Jyotirao Phuleमहात्मा फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवरील अडचणी, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक व त्यावरील सरकारचे दुर्लक्ष हे सविस्तर पणे पुस्तकामध्ये दिलेले आहे.
Bhashashuddhi - Novel: भाषाशुद्धी - कादंबरी
by Shri. Balarao Savarkarया पुस्तकांत वीर सावरकरांच्या भाषाशुद्धि या विषयावरील काही निवडक लेखांचे पुनर्मुद्रण करीत आहों. ह्यांतील बहुतेक लेखांचे पुस्तकरूपाने हे तिसरे पुनर्मुद्रण आहे यावरून या लेखांविषयींची मराठी वाचकवर्गाला वाटणारी अभिरुचि आणि आवश्यकता व्यक्त होत आहे. वीर सावरकर लिखित भाषा शुद्धी या पुस्तकामध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, अरबी, फारशी, इंग्रजी, परराष्ट्रीय, उर्दू, पारशी, इत्यादी भाषांचे महत्व व त्या भाषांचे एकमेकांशी असलेले वेगवेगळे अर्थ आणि एकमेकांमधील फरक कसा आहे हे सविस्तर पणे दाखवले आहे.
Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी
by Shri. Shripad Nagnath Rautwadसामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.
Muktipatha: मुक्तिपथ
by Ashok Tapase Harshada Tapaseमुक्तिपथ या पुस्तकामध्ये विश्वाची आजची परिस्थिीती पाहून अनेकदा अनेकांना असे वाटते, "युद्ध नको बुद्ध हवा" पण बुद्ध म्हणजे नक्की काय हे या पुस्तकामधून शिकवले आहे. यामध्ये बुद्धांची शिकवण दिली आहे. बुद्धांचे विचार, सुखाचा, मुक्तीचा मार्ग, 'तिपिटक' या पुस्तकात सांगितले आहेत.
Pharmacist Tumchya Arogyasathi - Novel: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी - कादंबरी
by Shri. Ashish Karleअन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__
Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी
by Shri. Dr. A. P. Dhandeब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.
Marathi Balbharati class 5 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी बालभारती इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पाठ व कविता मिळून संत्तावीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठपुस्तकात विद्यार्थ्यांना घर व परिसरातील व्यक्तींशी घटना-प्रसंगानुरूप बोलता यावे, स्वच्छता, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर विचार करायला ते प्रवृत्त व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण, त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनुभवकथन यांतून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होईल. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, खेळ खेळूया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी' या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव दिला आहे.
Apan Ase Ghadalo Parisar Abhyas Bhag 2 class 5 - Maharashtra Board: आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड.
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneआपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. इतिहास म्हणजे एक शास्त्र आहे, याची जाणीव प्रथमपासूनच मुलांच्या मनात रुजावी अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. आदिमानव ते आधुनिक मानव ही वाटचाल समजून घेता घेता, त्या वाटचालीत निसर्ग आणि परिसर या दोन घटकांचे अत्यंत महत्त्व आहे. मानवाने त्याच्या गरजेप्रमाणे साधनांची निर्मिती केली. हवामानातील बदलानुसार त्याच्या भोवतीचा परिसर बदलला. त्यामुळे त्याच्या गरजा आणि त्यांना अनुसरून त्याच्या कामांचे स्वरूप बदलले. म्हणून त्याने तयार केलेल्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. 'प्रगत बुद्धीच्या मानवाने' गाठलेला नागरी संस्कृतीचा टप्पा हा प्रागैतिहासिक काळाचा परमोच्च बिंदू. येथून ऐतिहासिक काळाची सुरुवात होते. अशा प्रकारे मानवाच्या वाटचालीची माहिती या पुस्तकातून दिलेली आहे.
Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.
Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी
by Shri. Ashok Kothareअशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.
Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी
by Ravindra Fadakeरवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.
Abhimanachi Leni - Novel: अभिमानाची लेणी - कादंबरी
by Devendra Bhujbalदेवेंद्र भुजबळ यांनी 'अभिमानाची लेणी' या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच 'राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन, युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.
Itihas va Nagrikshstra class 7 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये तेरा व नागरिकशास्त्रामध्ये सहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे. मध्ययुगीन भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे स्थान व भूमिका केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. नागरिकशास्त्राच्या भागात भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात आली आहे. भारताच्या संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधानाची उद्देशिका, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व हा आशय मांडण्यात आला आहे.
Bhugol class 7 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneभूगोल इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.
Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.
Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी
by Mohan Madwannaआपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.
Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी
by Ulhas Hari Joshiआपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.