- Table View
- List View
Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.
Marathi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी युवकभारती इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात पाच विभाग आहेत. या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. साहित्यप्रकार म्हणून 'नाटक' या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. 'दृक्-श्राव्य साहित्यप्रकार' याचा अभ्यास करणार आहात. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील.
Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneमराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.
Nyay - Novel: न्याय - कादंबरी
by Jagdish Khandewaleहजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.
Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.
Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.
Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneपरिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.
Pharmacist Tumchya Arogyasathi - Novel: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी - कादंबरी
by Shri. Ashish Karleअन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__
Rajyashastra class 11 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneराज्यशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये चार विभाग केले आहेत - राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध, या प्रत्येक विभागाची सुरुवात त्या संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली आहे. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासायच्या आहेत. अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी तुम्हाला माहितीपर चौकटी, विविध कृती विषयाच्या प्रस्तावनेने स्पष्ट करण्यात आलेली आहे.
Rajyashastra class 12 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneराज्यशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इ.स.१९९१ पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे. त्यात जगातील १९९१ पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्यांचा परिचय करून देण्यात आला आहे. पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत.
Samajshastra class 11 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसमाजशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये समाजशास्त्राची ओळख, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान तसेच समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजीकरण, सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.
Samajshastra class 12 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसमाजशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये काही माहिती चौकटीत दिली आहे. शिवाय प्रात्यक्षिकासाठी कृती करण्यास सुचवले आहे. तुमचे स्वयंअध्ययन सोपे व्हावे, त्यामध्ये रस निर्माण व्हावा यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला आहे आणि यामुळे तुमच्या क्रियाशील सहभागाला चालना मिळेल. या पाठ्यपुस्तकामुळे समाजशास्त्राच्या अभ्यासकास भारतीय समाजाचे अनेक स्तर आणि वैविध्यपूर्ण संस्कृती समजून घेणे सुलभ होईल. या पाठ्यपुस्तकात अधोरेखित भारतीय समाजाचे प्रभावी स्वरूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही भारतीय समाजाचे नवीन दृष्टिकोनातून आकलन करून घ्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
Samanya Vidyan class 8 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘सामान्य विज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतूहा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घ्या व इतरांना समजवा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून सांगितले आहे. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
Samanya Vigyan class 6 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सोळा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सामान्य विज्ञान विषयाच्या अपेक्षित क्षमता नमूद केल्या आहेत. या क्षमतांच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील आशयाची नावीन्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करणे, कृतींच्या आधारे माहिती मिळविणे, माहितीचे संकलन करणे व त्यानुसार वर्गीकरण, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे इत्यादींवर आधारित कृती, उपक्रम व आशयासाठी पुस्तकात विविध शीर्षकांचा वापर केला आहे. पुस्तकात दिलेली पूरक माहिती विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करू शकेल.
Samanya Vigyan class 7 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneसामान्य विज्ञान इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. विज्ञानाच्या या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू “समजून घ्या व इतराना समजवा” हा आहे. 'निरोक्षण व चर्चा करा', 'जरा डोके चालवा', 'शाधा पाहू', 'विचार करा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृतीमध्ये भाग घ्या. थोडे आठवा', 'सागा पाहू' या कृतींचा उपयाग उजळणीसाठी करा. पाठ्यपुस्तकात 'करून पहा', 'करून पाहूया' अशा अनेक कृताचा आणि प्रयागाचा समावेश केलेला आहे. या विविध कृती, प्रयाग, निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. पाठांमध्ये काही ठिकाणी तुम्हांला माहिती शोधावी लागल, तो शोधण्यासाठी ग्रंथालय, तत्रज्ञान जस इंटरनेट याचीही मदत घ्या.
Sharad Pawar Power Niti - Novel: शरद पवार पॉवर नीती - कादंबरी
by Yashraj Parkhiपद्मविभूषणाने सन्मानीत, राजकारणातील द्रोणाचार्य, मा. कृषीमंत्री, मा. संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातले पंतप्रधान, अद्भुत स्मरणशक्तीचे बादशाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र गोविंदराव पवार; ह्यांच्या जीवनावर व त्यांच्या जीवनाचे सिद्धांत, तत्वे, कार्यप्रणाली, नीती ह्यावर आधारित हे पुस्तक आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, शरद पवार पॉवर नीती हे पुस्तक तुमच्या यशस्वी जीवनाची नीती ठरवण्यासाठी देखील सहकार्य करेल. शरद पवार साहेबांचे सर्वच पैलू ह्या पुस्तकात मांडले आहेत. शरद पवार ह्यांची अनेक रहस्ये ह्या पुस्तकात पुंजगती भौतिकशास्त्राच्या आधारे मांडली आहेत.
Shivchatrapati Parisar Abhyas Bhag 2 class 4 - Maharashtra Board: शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneशिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्रोत मानली जाते. पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तिदायी घटना दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून आणि व्यक्तिगत पातळीवर आलेल्या तक्रारींची व सूचनांची समितीने योग्य पद्धतीने छाननी करून प्रस्तुत पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे. तसेच आवश्यक तेथे काही अनुरूप अशा दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्रातील काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करण्यात आले आहे.
Suryaputra Lokmanya - Novel: सूर्यपुत्र लोकमान्य - कादंबरी
by Smita Damleलोलकातून (प्रिझम् मधून) सूर्यकिरणं आरपार गेली की त्यातले सप्तरंग उजळून निघतात. कै.सदाशिव विनायक बापट यांच्या लोकमान्य टिळकांच्या ‘आठवणी आणि आख्यायिका' या दोन खंडांचंही तसंच आहे. स. वि. बापटांनी चिवटपणे, अफाट मेहनत घेऊन ह्या आठवणींच्या रूपाने लोकमान्यांना आपल्यासमोर कायमचं जिवंत केलं. त्याचाच आढावा घेत ही कांदबरी डॉ. स्मिता दामले यांनी वाचकांसमोर आणली आहे.
Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.
Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneतत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.
Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी
by Vinita Deshpandeअभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.
Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी
by Bhagyashree Patilभारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.
Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetअर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.
Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.
Bhugol Digest class 11 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetभूगोल इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या त्या प्रकरणाचा सर्वांगीण व सुबोध असा 'गोषवारा' दिला आहे. तो वाचून प्रकरणाचा आशय व त्यातील महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पना यांचे आकलन होणे विद्यार्थ्यांना सुलभ होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी प्रश्न, लघूत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न आदी सर्व प्रकारच्या अपेक्षित प्रश्नांचा त्यांच्या मुद्देसूद, अचूक आणि आदर्श उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. तसेच, उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे प्रमाणबद्ध, सुबक व सोप्या आकृत्यांचा व नकाशांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी या प्रश्नपत्रिका खचितच उपयुक्त ठरतील.