Browse Results

Showing 1 through 25 of 115 results

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU

by Abc

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विशेष स्तरावर हा ‘लोकसंख्या भूगोल’ विषय लागू केला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. 'लोकसंख्या' या विषयावर अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी

by Amish Tripathi

सीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्‍या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.

Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान

by Dada Bhagwan

कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.

20 Vya Shatakatil Jagacha Itihas 1914-1992 T.Y.B.A. Savitribai Phule Pune University: 20 व्या शतकातील जगाचा इतिहास 1914-1992 तृतीय वर्ष कला सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठ

by N. S. Tamboli

20 व्या शतकातील जगाचा इतिहास (1914-1992) [History of the World in 20th Century (1914-1992)] हे पुस्तक सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाच्या जून 2015 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच यू. जी. सी. अभ्यासक्रमावर आधारित आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाने केलेल्या नियोजनानुसार 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय 'वर्ष कला'व्या जनरल पेपर-3 साठी 'विसाव्या शतकातील जगाचा इतिहास' (1941-1992) हा विषय सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात पाच प्रकरणे तर दुसऱ्या सत्रात चार प्रकरणे अशी एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यांपैकी पहिले प्रकरण 'संकल्पनांचा अभ्यास’ हे असून त्यात एकूण बारा संकल्पनांवर लेखन केले आहे. दुसरे प्रकरण पहिले महायुद्ध हे असून त्यात सुरुवातीला कारणे व परिणाम यांवर चर्चा केली असून पॅरिस शांता परिषद आणि राष्ट्रसंघाच्या कार्याचे टीकात्मक परीक्षण केले आहे. तिसरे करण रशियन राज्यक्रांतीचे असून त्यात सुरुवातीस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी विशद केली आहे. या क्रांतीतील लेनिनचे योगदान देताना त्याचे नवीन आर्थिक धोरण तसेच स्टॅलिन व त्याच्या काळातील पंचवार्षिक योजनांवर प्रकाश टाकला आहे. चौथे प्रकरण हुकूमशाहीचा उदय हे असून त्यात इटली, जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रातील अनुक्रमे मुसोलिनी, हिटलर व केमाल पाशा या हुकूमशहांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. पाचदे प्रकरण महामंदी हे असून त्याचे स्वरूप, कारणे व परिणामांचे विवेचन करताना महामंदी दूर व्हावी यासाठी तत्कालीन विविध उपाययोजनांची सविस्तर चर्चा केली आहे.

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Radhey - Novel: राधेय - कादंबरी

by Ranjit Desai

"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

1984-George Orwell - Novel: १९८४-जॉर्ज ऑरवेलने - कादंबरी

by George Orwell

‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे. या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

ECO 277 Antararashtriya Arthashastra T.Y.B.A - Y.C.M.O.U

by Sau. Mahajan Vijay Kakade Prof. Dr. Sudhakar Kulkarni

Antararashtriya Arthashastra ECO 277 text book for T.Y.B.A from Yashavantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.

Sanyasi Jyane Apli Sampati Vikli: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली

by Robin Sharma

संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली हे रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच जयको पब्लिशींग हाऊस यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ही प्रेरणादायक गोष्ट अधिकाधिक धैर्य, संतुलन, विपुलता आणि आनंदाने जगण्यासाठी एक प्रेरणादायी दृष्टीकोन प्रदान करते. एक आश्चर्यकारकपणे रचली गेलेली दंतकथा आहे, संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली ज्युलियन मेंटलची विलक्षण गोष्ट सांगतात. वकील ज्यांला त्याच्या आऊटबॅलेन्सच्या जीवनातील आध्यात्मिक संकटाचा सामना करण्यास भाग पाडले होते. एका प्राचीन संस्कृतीच्या जीवनदायी साहसपूर्ण प्रदिर्घ प्रवासावर, तो आपल्याला शक्तिशाली, शहाणे आणि व्यावहारिक धडे शोधून काढतो, ज्या आपल्याला शिकवतात: आनंदी विचारांचा विकास करा,आपल्या जीवनाचे ध्येय आणि कॉलिंग अनुसरण करा, स्वत: ची शिस्त लावा आणि धैर्याने कार्य करा, आमची महत्वाची वस्तू म्हणून वेळ, आपल्या नातेसंबंधांचे पोषण करा आणि आनददायी जीवन जगा.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Dhind FYBA - SPPU

by Shankar Patil

“म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.” राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, “हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.” रामभाऊ हसून म्हणाले – “गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!” “अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.” “उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?” “अहो, काय चढलीया काय मला?” “अजून चढली न्हाई म्हणतोस?” “अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!” एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, “शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?” “शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?” “दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?” “माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?” “मग खाली जागा नव्हती काय?” “ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!” राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.

Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी

by Ranjit Desai

रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

Samagra Ekankika FYBA - SPPU

by Premanand Gajvi

या एकांकिकांविषयी कोणतेही भाष्य करणं उचित ठरणार नाही. हा कलावंतांचा, रसिकांचा अधिकार. तरीही एक सांगितलं पाहिजे. "घोटभर पाणी' ही एकच एकांकिका प्रेमानंद गज्वीनी लिहिली असती नि नंतर काहीच लिहिलं नसतं तरी गज्वीचं नाव मराठी नाटयवाङ्मयाच्या इतिहासात सन्मानानं घेतलं गेलं असतं." असं म्हटलं गेलंय. अशा या एकांकिकेचे एकूण ३००० प्रयोग झाले असून ४५७ पारितोषिकं तिला प्राप्त झाले आहेत. या एकांकिकेचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषात अनुवाद झालेला आहे. आता पर्यंत लिहिलेल्या सोळा एकांकिका या पुस्तकात समग्र स्वरुपात प्रकाशित होत आहेत.

Arthat

by Achyut Godbole

अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय चूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. खकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक घांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी कलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा हे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून कते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील मवंतांनी रवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत न् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच.

Satyache Prayog Athava Atmakatha - Novel: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - कादंबरी

by Mohandas K. Gandhi

महात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादाची ही तिसरी आवृत्ती नवजीवन ट्रस्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांतून नवजीवन ट्रस्टने वाचकांना उपलब्ध करून दिलाच आहे. आज तो मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. श्री. आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपला मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्याची आम्हाला परवानगी दिली, याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ग्रंथाचे शेवटी छोटीशी विषयसूची जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाचकवर्गाची चांगली सोय होईल, अशी आशा आहे. महाराष्ट्रीय वाचकवर्ग पूर्वीप्रमाणे या आवृत्तीचाही यथायोग्य परामर्श घेईल, असा भरवसा वाटतो. ही चौथी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना आम्हास आनंद वाटतो. गांधीशताब्दी निमित्त मराठी जनता ह्या ग्रंथाचे प्रकर्षाने स्वागत करील, अशी आम्हास आशा आहे. ह्यातील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नियमावलीस धरून आहे.

Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) MAR 210 S.Y.B.A. Y.C.M.O.U

by Rajan Gavas Dr Mangala Warkhede Dr Dilip Dhondage

MAR 210 Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी

by Leo Tolstoy

लिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Samanata

by Shri. Dinkar Sakrikar

प्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.

Refine Search

Showing 1 through 25 of 115 results