या एकांकिकांविषयी कोणतेही भाष्य करणं उचित ठरणार नाही. हा कलावंतांचा, रसिकांचा अधिकार. तरीही एक सांगितलं पाहिजे. "घोटभर पाणी' ही एकच एकांकिका प्रेमानंद गज्वीनी लिहिली असती नि नंतर काहीच लिहिलं नसतं तरी गज्वीचं नाव मराठी नाटयवाङ्मयाच्या इतिहासात सन्मानानं घेतलं गेलं असतं." असं म्हटलं गेलंय. अशा या एकांकिकेचे एकूण ३००० प्रयोग झाले असून ४५७ पारितोषिकं तिला प्राप्त झाले आहेत. या एकांकिकेचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषात अनुवाद झालेला आहे. आता पर्यंत लिहिलेल्या सोळा एकांकिका या पुस्तकात समग्र स्वरुपात प्रकाशित होत आहेत.