Browse Results

Showing 1 through 25 of 112 results

10 Advanced Short Stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

The Advance level book of short stories from Pratham books, used in the ACR project, Pune.

10 Basic short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

10 Basic level short stories in Full text with Human Narration, selected from Pratham books for the ACR project in Pune.

10 Intermediate short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

This is the 2nd part of selected stories in Full text with Human narrated audio, from Pratham books, which are used for the ACR project in Pune.

1984-George Orwell - Novel: १९८४-जॉर्ज ऑरवेलने - कादंबरी

by George Orwell

‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे. या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.

20 Vya Shatakatil Jagacha Itihas 1914-1992 T.Y.B.A. Savitribai Phule Pune University: 20 व्या शतकातील जगाचा इतिहास 1914-1992 तृतीय वर्ष कला सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठ

by N. S. Tamboli

20 व्या शतकातील जगाचा इतिहास (1914-1992) [History of the World in 20th Century (1914-1992)] हे पुस्तक सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाच्या जून 2015 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच यू. जी. सी. अभ्यासक्रमावर आधारित आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाने केलेल्या नियोजनानुसार 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय 'वर्ष कला'व्या जनरल पेपर-3 साठी 'विसाव्या शतकातील जगाचा इतिहास' (1941-1992) हा विषय सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात पाच प्रकरणे तर दुसऱ्या सत्रात चार प्रकरणे अशी एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यांपैकी पहिले प्रकरण 'संकल्पनांचा अभ्यास’ हे असून त्यात एकूण बारा संकल्पनांवर लेखन केले आहे. दुसरे प्रकरण पहिले महायुद्ध हे असून त्यात सुरुवातीला कारणे व परिणाम यांवर चर्चा केली असून पॅरिस शांता परिषद आणि राष्ट्रसंघाच्या कार्याचे टीकात्मक परीक्षण केले आहे. तिसरे करण रशियन राज्यक्रांतीचे असून त्यात सुरुवातीस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी विशद केली आहे. या क्रांतीतील लेनिनचे योगदान देताना त्याचे नवीन आर्थिक धोरण तसेच स्टॅलिन व त्याच्या काळातील पंचवार्षिक योजनांवर प्रकाश टाकला आहे. चौथे प्रकरण हुकूमशाहीचा उदय हे असून त्यात इटली, जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रातील अनुक्रमे मुसोलिनी, हिटलर व केमाल पाशा या हुकूमशहांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. पाचदे प्रकरण महामंदी हे असून त्याचे स्वरूप, कारणे व परिणामांचे विवेचन करताना महामंदी दूर व्हावी यासाठी तत्कालीन विविध उपाययोजनांची सविस्तर चर्चा केली आहे.

Abhimanachi Leni - Novel: अभिमानाची लेणी - कादंबरी

by Devendra Bhujbal

देवेंद्र भुजबळ यांनी 'अभिमानाची लेणी' या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच 'राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन, युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.

Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी

by Vinita Deshpande

अभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.

Agarkar Vangamay Khand 1 - Novel: आगरकर-वाङ्मय खंड १ - कादंबरी

by M. G. Natu D. Y. Deshpande

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी

by Ravindra Fadake

रवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

Apan Ase Ghadalo Parisar Abhyas Bhag 2 class 5 - Maharashtra Board: आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. इतिहास म्हणजे एक शास्त्र आहे, याची जाणीव प्रथमपासूनच मुलांच्या मनात रुजावी अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. आदिमानव ते आधुनिक मानव ही वाटचाल समजून घेता घेता, त्या वाटचालीत निसर्ग आणि परिसर या दोन घटकांचे अत्यंत महत्त्व आहे. मानवाने त्याच्या गरजेप्रमाणे साधनांची निर्मिती केली. हवामानातील बदलानुसार त्याच्या भोवतीचा परिसर बदलला. त्यामुळे त्याच्या गरजा आणि त्यांना अनुसरून त्याच्या कामांचे स्वरूप बदलले. म्हणून त्याने तयार केलेल्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. 'प्रगत बुद्धीच्या मानवाने' गाठलेला नागरी संस्कृतीचा टप्पा हा प्रागैतिहासिक काळाचा परमोच्च बिंदू. येथून ऐतिहासिक काळाची सुरुवात होते. अशा प्रकारे मानवाच्या वाटचालीची माहिती या पुस्तकातून दिलेली आहे.

Arthashastra class 11 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना उदाहरणार्थ, पैसा, आर्थिक वृद्धी व विकास, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन, संख्याशास्त्र इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाची मांडणी ही अर्थशास्त्रीय भाषेशी कोणतीही तडजोड न करता सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून केली आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक तेथे विविध चित्राकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा वापर केला आहे. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना, शब्द यांसाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टही देण्यात आले आहे.

Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

अर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Ashru - Novel: अश्रू - कादंबरी

by Vishnu Sakharam Khandekar

या विसाव्या शतकानं जगाला बर्‍यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षातघेऊन वाईट करण्यास न कतणारा सामान्य माणूस.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Bhashashuddhi - Novel: भाषाशुद्धी - कादंबरी

by Shri. Balarao Savarkar

या पुस्तकांत वीर सावरकरांच्या भाषाशुद्धि या विषयावरील काही निवडक लेखांचे पुनर्मुद्रण करीत आहों. ह्यांतील बहुतेक लेखांचे पुस्तकरूपाने हे तिसरे पुनर्मुद्रण आहे यावरून या लेखांविषयींची मराठी वाचकवर्गाला वाटणारी अभिरुचि आणि आवश्यकता व्यक्त होत आहे. वीर सावरकर लिखित भाषा शुद्धी या पुस्तकामध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, अरबी, फारशी, इंग्रजी, परराष्ट्रीय, उर्दू, पारशी, इत्यादी भाषांचे महत्व व त्या भाषांचे एकमेकांशी असलेले वेगवेगळे अर्थ आणि एकमेकांमधील फरक कसा आहे हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.

Bhugol class 6 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.

Bhugol class 7 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.

Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

भूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.

Bhugol Digest class 11 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

भूगोल इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या त्या प्रकरणाचा सर्वांगीण व सुबोध असा 'गोषवारा' दिला आहे. तो वाचून प्रकरणाचा आशय व त्यातील महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पना यांचे आकलन होणे विद्यार्थ्यांना सुलभ होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी प्रश्न, लघूत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न आदी सर्व प्रकारच्या अपेक्षित प्रश्नांचा त्यांच्या मुद्देसूद, अचूक आणि आदर्श उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. तसेच, उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे प्रमाणबद्ध, सुबक व सोप्या आकृत्यांचा व नकाशांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी या प्रश्नपत्रिका खचितच उपयुक्त ठरतील.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Refine Search

Showing 1 through 25 of 112 results